Saturday, April 27, 2013

राघव



राघव गावाकडुन आलेला एक युवक.
इथे ईजिनिअर झाला अन एका कारखान्यात नोकरीस लागला.
हुशार व मेहनति असल्याने कारखान्यात जम बसला.
व मालकाची मदत व काहि घरुन मदत असे करुन त्याने वन रुम किचन चा एक ब्लॉक विकत घेतला.
जागा झाली अन लग्नाच्या तयारिला लागला. अन रेवति शी त्याचा विवाह संप्पन झाला..
रेवति दिसायला खुप सुंदर अशी तरुणी होति.
राघवला प्रष्ण पडायचा ह्या इतक्या लावण्यवतिने आपल्या सारख्या साधारण माणसाशी लग्न कसे व का केले असावे?
पण नव्हाळीचे दिवस होते..दोघेहि प्रेमात आकंठ बुडाले होते.
त्यामुळे तो विषय बाजु पडला.रेवति सुस्वभावि पण होति.
सुटी संपली अन राघव कामास रुजु झाला.
त्याच वेळी कंपनित कामाचा लोड वाढला व त्याला २ पाळ्यात काम करण्याच्या सुचना मिळाल्या
रात्रपाळीचा त्याचा पहिला दिवस होता..शिफ्ट संपली रात्रीचे साडेबारा वाजता तो घरी निघाला घरच्या ओढिने रस्ता भराभर मागे पडत होता.
सव्वा वाजता घरी आला अन बेल वाजवली दार उघडलेगेले अन राघव आत आला पण रेवति दिसली नाहि..
त्याने शुज काढले व वॉश घेतला ..
आत बेडरुम मधे आला तर रेवति शांत झोपलेली पाहिली ,,झोपेत किति छान दिसत होति..
अंगावर हात टाकत तिला जवळ घेतले तर..झोपु द्या हो..म्हणत तिने कुस बदलली ..
सकाळी राघव तिला म्हणाला कि रात्री दार उघडल्यावर तु समोर स्वागता साठी असशिल अस वाटल होत..
खुप दमते रे मी रोजच्या कामानी ..रेवति म्हणाली..
राघव या वर काहिच बोलला नाहि..
२-३ दिवस झाले पण असच घडत होत.
कारखान्यात कामावर राघव विचार करत होता..कि दार बेडरुम पासुन १२-१५ फुट दुर आहे दार उघडल्यावर इतक्या कमी वेळात रेवति परत बेडवर जाऊन कशी झोपत असेल??
याचा छडा लावायच त्याने ठरवले...
कामावर जाण्या पुर्वि त्याने रेवति च्या न कळत बेडरुम च्या खिडकिला एक बारिक छिद्र पाडुन ठेवले ज्या योगे आतले दिसु शकेल.. 
कां संपल्यावर एका मित्राला त्याने बरोबर घेतले ..व मी बेडरुम च्या खिडकिच्या जवळ उभा रहातो मिस कॉल आला कि तु बेल वाजव अश्या सुचना त्याने मित्राला दिल्या
मिस कॉल दिल्यावर राघवने खिडकितुन आत पाहिले.
बेलचा आवाज झाला अन रेवतिने झोपेतच आपला हात पांघरुणातुन बाहेर काढला व एखाद्या सर्पा प्रमाणे तोलांब होत सरपटत कडि पर्यंत गेला  जवळ जवळ तिचा हात १२-१५ फुट लांब झाला होता कडी काढल्याचा आवाज झाला व तिच हात आकुंचन पावत पुन्हा पांघरुणात गेला.
हे पाहुन राघवची बोबडी वळाली त्याने फोन वरुन मित्रास घरी जाण्यास सांगितले व आत आला 
रेवति शांत झोपली होति.
राघव समजुन चुकला होता कि तो एका अमानवि, अघोरि कृत्ये बरोबर संसार करित आहे.
राघवचे आंग तापाने फणफणु लागले व तो बेडवरच बेशुद्ध पडला..
अन तो उठलाच नाहि..
आजहि राघव व रेवति यांचा संसार सुखाचा चालु आहे...
मात्र तो ब्लॉक कायम बंद असतो.....