Monday, July 1, 2019

प्रेम एक अनुभुति..सायुज्जते कडे जाण्याचा प्रवास...
*
प्रेम भावना हि सा~यांनाच हवि हविशी वाटणारी आहे.."पहिलिच भेट झाली,पण ओढ हि युगाची"अशी हि भावना असते..क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा" हे गडक~यांचे म्हणणे किति सार्थ आहे.
आपण कुणावर तरी प्रेम करावे..अन कूणी तरी आपणावर जिव तोडुन प्रेम करावे हि मानवाचि उपजत अन निसर्ग दत्त अशी भावना आहे..असते..
*
प्रेमाचि सुरवात आपल्या विचारां पासुन होते..प्रेमाच्या विचाराचे तरंग मनात आले कि प्रेमाचा विचार सुरु होतो...मनात घोळणा~या प्रेमाच्या विचाराने प्रेमाची अनुभुति, व प्रेमानुभव निर्माण होतात.
*
तुम्हि कुठल्याच व्यक्तिवर तो पर्यंत प्रेम करु शकत नाहि जो पर्यंत तुमच्या मनात त्याचा बद्दल सन्मानाचि, आदराचि भावना नाहि...सर्वात प्रथम तुमच्या मनांत स्वत:बद्दल आत्म सन्मानाचि भावना तुम्हि निर्माण करायला हवि...व ति निर्माण करताना स्वत:स विचारा " माझ्यात असे काय आहे ज्या बद्दल मला स्वत:चा आदर आहे?
*
.प्रेमाचे गणीत विचित्र असते...प्रेम मिळवायचे असेल तर आधि ते मुक्त पणे वाटावे लागते..प्यार बाटते चलो...जितके प्रेम तुम्हि वाटत चालाल तितके बदल्यात तुम्हाला ते परत मिळत राहिल...सदह्रुदयी व्हा, प्रेमळ व्हा व त्या प्रमाणे वागा, वागायचा प्रयत्न करा...प्रेमसंबंधाला होकार देवुन त्यात झोकुन देण्या पुर्वी असा विचार करु नका कि हि व्यक्ति माझ्या साठी काय करेल??उलट पक्षि असा विचार मनांत येवु द्या कि मी माझ्या साथिदारासाठी काय करु शकेल????साथिदारा बाबतचि हि समर्पणाचि भावना हेच सुखि प्रेम संबंधांचे रहस्य आहे...
*
प्रेम म्हणजे एकमेकाच्या डोळ्यात पहाणे नसुन,दोघांनि एखाद्या गोष्टीकडे, एकाच विचाराने,एकाच वेळी बरोबरीने बघणे असेच नव्हे काय??...प्रेम म्हणजे त्या व्यक्तिस आहे तशी गुण दोषा सकट स्विकारणे..ति कशी दिसते? तिच्यात काय गुण आहेत याचे मुल्यमापन करुन नव्हे...मैत्रीच्या मातितच प्रेमाचि बिजे रुजतात व अंकुरतात.........
*
स्पर्ष प्रेम व्यक्त करण्याचे प्रभावि साधन आहे..जि भावना अनेक शब्दात तुम्हि व्यक्त करु शकणार नाहि ते काम एक हळुवार स्पर्ष करुन जातो...स्पर्षाने मानसिक व शारीरीक बंधने संपतात...व एक निराळा प्रेम संवाद सुरु होतो........
*
ज्या कुणावर प्रेम करीत असाल त्यास मुक्त सोडा, मोकळीक द्या...बंधनात अडकवु नका...त्यास जायचे तिकडे जावु द्या..जर ते प्रेम तुमचेच असेल तर तुमच्या कडे नक्किच परत येईल,आणी जर आले नाहि तर ते तुमचे नव्हतेच..कधिच नव्हते..तो एक तुमचा भ्रम होता..बंधनात प्रेम फुलत नाहि....प्रेम म्हणजे एक भयमुक्त,अहंकार विरहित अवस्था..अनुभव........
*
जर तर,किंतु परंतु, च्या पलीकडली एक सुखद अवस्था,...प्रेम म्हणजे..आज पासुन मी भयमुक्त आहे,माझ्या भुतकाळातल्या घटना चुका,आता मला घाबरवु शकत नाहि अशी एक नविन भयमुक्त,आत्मविश्वास पुर्ण अश्या नव्या जिवनाची सुरवात.......
*
तुम्हि जर आपल्या साथिदारा कडुन अमर्याद प्रेमाचि अपेक्षा करीत असाल तर,त्याच्या प्रेमाशि,त्याच्याशी तुमचि बांधिलकी,प्रतिबध्ध्ता हवि,...व ति तुमच्या बोलण्यातुन वागण्यातुन,कृतितुन पदोपदि दिसावयास हवि...तुमच्या ह्या कमिट्मेंट मुळे, प्रेमास एक ताकद मिळत असते..व त्याचि गोडिहि वाढत असते...जेंव्हा कुणाच्या प्रेमाशि तुम्ही वचन बध्ध असता त्या वेळी त्यातुन सुटुन जाणे हा पर्याय कधिच नसतो...वचन बध्धते मुळे प्रेमाचे नाजुक बंधने अजुन मजबुत होतात........
*
एक मेका बद्दल वाटणारे आकर्षण हा प्रेमातला खुप महत्वाचा भाग आहे...ह्या आकर्षणा मुळे प्रेम फुलत रहाते..मनातुन शरीरा कडे असा हा अल्हादकारी,रोमांचक असा प्रवास असतो...ते शरीरा पुरते मर्यादित नसते तर तुम्हाला वाटणारा विश्वास,प्रेम,उत्साह,यातुन ये जागृत होत असते...प्रेम व सुखाचा तो एक असा सागर आहे ज्यात रोज बुडुन जायचे असते व जिवन जगायचे असते...जिवन समृध्ध पणे जगण्यासाठी ति एक प्रेरणा व मानसीक स्तरावर,आत्मीक प्रेमानुभव देणारी एक शक्ति आहे................
*
प्रेमात परस्परावरील विश्वासास खुप महत्व आहे...शंकेचा एक विचारहि तुमच्या साथीदाराच्या मनांत भिति, तणाव व खळबळ निर्माण करु शकतो..जर तुमच्या मनांत विश्वासाचि भावना नसेल तर प्रेमाची संपुर्ण अनुभुति तुम्हास कधिच मिळणार नाहि...आपल्या साथिदारावर प्रेम करताना त्याच्या मनांत "ह्याचे प्रेम अक्षय आहे" अशी भावना निर्माण होवु द्या.... प्रेमात वचन बध्ध होण्या पुर्वी स्वत:स विचारा कि "माझा त्याच्यावर/तिच्यावर पुर्ण १००% विश्वास आहे?" जर उत्तर हो असेल तरच पुढ्चे पाऊल टाका...नसेल तर पदरी निराशाच येणार नाहि का?...............
व्यक्त व्हा..व सहजिवनाची सुरवात करा व अक्षय आनंद अनुभवा....

हाय -कुणीतरी त्याला म्हणाले

हाय -कुणीतरी त्याला म्हणाले
त्याने मागे वळून पाहिले
पौराणिक सिरियल्स मध्ये घालतात तसे कपडे घालून तो उभा होता
आपण कोण आयमीन ओळखलं नाही आपल्याला
मी यमदूत आपल्याला घ्यायला आलो आहे
हे ऐकताच त्याला घाम फुटला
मला वेळ दे बायका मुलांना शेवटचं भेटू देत
ते शक्य नाही -मला अनुमती देण्याचा अधिकार नाही
पण लक्षात घे तु नेहमी ज्या खुर्चीवर बसतोस तिथे बसला कि तू तात्काळ गतप्राण होशील
समजा मी बसलोच नाही खुर्चीवर तर ?
तर तुला एक जीवदान मिळेल
समजा मी पळून गेलो तर ?
तसा विचार पण करू नकोस -ते अशक्य आहे
तो अंतर्धान पावला
जनरल स्टोर मध्ये माल देणे पैसे मोजणे त्याने चालू ठेवली
तेव्हढ्यात दुकानात ३ टपोरीं टाईप माणसे आली
गल्ले मे कितना रोकड है ?सूरी च पाट त्याच्या गेल्यावर टेकवत तो म्हणाला
मालूम नाही गिनना पाडेगा
गिनो और रोकडा इधर दो -गडबड कि तो गला काट दूंगा
पैसा गिनानेको टाइम लागेगा -तब तक ट भाई आप खुर्चीपे बैठो
ठीक है मेरे डॉ साथीदार दिल्या पक्या बाहर है उनको बुलाओ
त्याने तसे केले
बाही खुर्चीवर बसला अन तात्काळ गतप्राण झाला
अरे भाईको क्या हुवा ? दिल्या पक्या ओरडले
कूच नाही भाई को चक्कर आ गायिली है -उन्हे दवाखानने ले जाओ तो म्हणाला
ते रिक्षात बसून गेले
त्याने हुश्श्य करत श्वास सोडला
संकट टळले होते
आपल्या अक्कल हुशारीे वर तो खुश होता
*
नातवा सुना मुलांनी त्याचा एकसष्ठी चा कार्यक्रम दणक्यात साजरा करावयाचे ठरवले होते
सायंकाळी कार्यक्रम होता --सारे नातेवाईक मित्र मंडळी अभिष्ट चिंतना साठी येणार होता
दुपारी जेवण झाले अन त्या अंमळ डुलकी लागली
स्वप्नात तो आला होता
ओळखले का ?
तू ??
हो मी -आज तुझी आठवण झाली म्हटले भेटावे --
नको रे आज माझ्या घरी कार्यक्रम आहे -तुझी अमंगल छाया त्यावर नको -कुठला शहाणा माणूस तुला वेल कम करेल ?? तुझे अभद्र रूप भयावह वाटते -तू निघून जा -कर तोंड काळे
अरे तुझे अभिष्ट चिंतन करावयास आलो होतो पण माझ्या बद्दल ज्या भावना तुझ्या मनात आहे ते पाहून काढता पाय घेत आहे -आता तू बोलावलेस तरी येणार नाही
अभिष्ट चिंतना बद्दल धन्यवाद -पण आता तू निघ व परत येऊ
तथास्तु म्हणत तो गेला
तो खाडकन जागा झाला -अंग घामानं डबडबलेलं होत
आपण ठीक आहे हे पाहिल्यावर त्याला हायसे वाटले
स्वप्न होते तर ते ..म्हणत स्वताशे हसला
-
कार्यक्रम सम्पला
रात्रीचे दहा वाजायला आले होते
आजोबा कार्यक्रम मस्त झाला तुम्ही दमला असाल ना
हो ना दगदग सहन नाही होत -तुन्ही पण दमला असाल ना
आजोबा तुम्ही आता विश्रांती घ्या
हो मी जातो तुम्ही बसा गप्पा मारत बरेच दिवसांनी एकत्र जमला आहात
दाराकडे जात असताना तो धाडकन पडला
काय झाले बघण्या साठी सारे उठले
तो जमिनीवर निपचित पडला होता
त्वरेने त्याला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले
दुस-या दिवशी डॉकटर म्हणाले
यांना अर्धांग वायू चा स्ट्रोक आला आहे
त्याच्या दोनही बाजू निकामी झाल्या आहेत
आता बेड रिडन अवस्था
-
तो आपल्या खोलीत भकास पणे पडला होता विचार करत
हलता येत नव्हते -मुश्किलीने कूस बदलदात येत असे मल मूत्र विसर्जन सारे अंथरुणात
एक मावशी ठेवली होती सेवेला
*
आता तो ८२ वर्षांचा झाला होता
खोलीचा नर्क झाला होता
मुले सुना सारे कंटाळले होते
घरात फिनेल चा उग्र दर्प कायम दरवळत असे
आजारा पडल्या पासून तो कायम देवाची करुणा भाकीत असे
२० वर्षे झाली पण देवास दया आली नाही
*
त्या रात्री तो आला -अरे काय तुझी अवस्था -बघवत नाही हाडाचा सापळा झाला आहेस नुसता --घाबरू नकोस मी आलो आहे तुला न्यायला-कायमचा ह्या त्रासातून सोडवायला
अरे मित्रा मी रोज तुला बोलावत होतो -पण तु आाला नाहीस २० वर्ष मी यातना सहन करत आहे
तो हसला
मला खूप यावेसे वाटत होते -पण तूच म्हणाला होतास मला वेल कम करणार नाही
म्हणून नाही आलो अपमान करून घ्यायला
तो काहीच बोलला नाही डोळ्यातून अश्रू ओघळत होते
दूताने फास आवळला -प्राण पाखरू कुंडीतून उडून गेले
*
सकाळी सोसायटीत बातमी पसरली
सुटला एकदाचा हे सारे जण म्हणत होते
*
मृत्यू किती मजेदार गोष्ट आहे
काहींना ती हवी असते
काहींना नको असते
पण मृत्यू हवे नको च्या पलीकडे असतो
वेळ झाली कि तो येतो व आपले काम चोख बजावतो